पुणतांबा चौफुलीवर कंटेनर खाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू दत्तनगर परिसरात हळहळ व्यक्त

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराजवळून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने या रस्त्याची पूर्ण दैना झाली आहे रोज दिवसाआड या पुणतांबा चौफुली परिसरात मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडत आहे त्यातच शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर कडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर एम.एच ४३ सी इ -८६९३ हा कंटेनर भरघाव वेगाने जात असतांना रुकसाना हसन बागवान राहणार दत्तनगर कोपरगाव या महिलेला जोराची धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदर वाहन चालका विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गणी हसन बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रजि.३६४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१),२८१,१२५(अ)(ब) मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बी एच तमनर हे करीत आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना या घटनांचे काहीही देणे घेणे नाही अनेक वेळा या रस्त्यांबाबत स्थानिक प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा या अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही या पुणतांबा चौफुलीवर अनेकांनी या जगाचा निरोप घेतला आहे तसेच अनेक जण जखमी होऊन

घरात पडून दुःखाची यातंना भोगत आहेत तरीही हे प्रशासन या घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच दिवसातून अनेक वेळा चारही बाजूकडील वाहतूक ठप्प होत आहे याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच ही चौफुली ओलांडताना लहान मोठ्या वाहन चालकांना मोठी कसरत करत या चौफुली ने जावे यावे लागते तर दुचाकी स्वरांना तर जीव मुठीत धरून चालावे लागते त्यातच ज्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे त्याने ते वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्यामुळे व सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने या रस्त्याची पूर्णपणे दैना झाली आहे त्यामुळे रोज ये जा करणाऱ्या शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना व कामानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कमरेचे पाठीचे आजार जडत आहे तसेच या पुणतांबा चौफुलीवरील चारही बाजूंच्या रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडले असून त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची व रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांनवर अपघातांची मालिका सुरूच आहे.