रस्ता मंजूर होऊनही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावी लागते चिखलातून कसरत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नाटेगाव ते नांदेसर शिव रस्त्याचे साधारण तीन चारशे फूट काँक्रीटिकरण मंजूर होऊनही विद्यार्थ्यांना रोज शाळेत येताना चिखलातून कसरत करावी लागते. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असुन लवकरच मंजूर रस्त्याचे काम त्वरित सूरु करावे म्हणून कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भेटून मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या बाबतची सविस्तर वृत्त असे की नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नातेगाव – नांदेसर शिव रस्ता हा सुमारे शंभर वर्षा पासून वहिवाट असलेला रस्ता असुन या भागात गावातील अनेक ग्रामस्थ शेतात वस्ती करून राहतात त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक वेळा कऱण्यात आली मागील काही वर्षा पूर्वी या रस्त्यावर दलीत वस्ती योजनेतून खडीकरण कऱण्यात आले होते मात्र गावापासून साधारण चार पाचशे फूट रस्त्याचा भाग खोलगट असल्याने या ठिकाणी पाणी साचून रस्त्याने ये जा करणे अवघड झाले त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती तत्कालिन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत आदेश दिला त्यातून या भागात चार पाचशे फूट रस्त्यावर काँक्रीटिकरण मंजूर केले पावसाळ्याच्या सुरुवातीला या रस्त्याला निधी मिळाला कामाचे टेंडर निघाले टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली मात्र अजुन कामाला सुरूवात झाली नाही ग्रामस्थांनी वेळोवेळी काम सूरु करावे अशी मागणी केली मात्र ग्रामसेविका यांच्या निष्काळजी पणा मूळे अद्याप काम सुरु झाले नाही त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना रोजच चिखलातून पायी कसरत करावी लागत असुन इतर ठिकाणी शूज शॉक्स घालून जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आपण पाहत असतो मात्र या भागातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच चिखलातून पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे वेळेवर या मुलांना पाय धुवायला सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी बरोबरच शेतकऱ्यांना शेती मध्ये जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे तसेच दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना दवाखान्यात नेतांना देखील मोठी कसरत करावी लागते त्यामुळे नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असुन या भागातील पालक लवकरच कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन मंजूर काम त्वरित सूरु करावे अशी मागणी करणार आहे जर हे काम वेळेत सुरू होऊन पूर्ण न झाल्यास कोपरगाव पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले