कुंभमेळ्या मध्ये कोपरगाव येथील गोदावरी नदीचा अंतर्भाव व्हावा यासाठी विभागीय उपायुक्त राणी ताठे यांना दिले निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कोपरगाव येथील आई गोदावरीचे प्रदुषण निर्मुलन करण्यात यावे.तसेच कोपरगाव शहरातील सर्व सांडपाणी आणि मलमुत्रयुक्त गटारी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्या आहेत त्यामुळे कोपरगाव शहर परिसरात गोदावरी नदी १००% प्रदूषित झालेली आहे. प्रदुषित पाण्यामुळे दर वर्षी लाखो मासे मरण पावतात तसेच नदीपात्रात आंघोळ करणाऱ्या लोकांना त्वचेचे आजार होतात यामुळे येथील पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य राहिले नाही.
तेव्हा सन २०२७ ला त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळा संपूर्ण झाल्यानंतर तेथील खुप सारे भाविक शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व कोकमठाण येथील आत्मा मालिक व कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रम व गोदावरी नदीकाठी असलेल्या बेट येथील गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना गोदावरी नदीत झालेल्या प्रदूषित पाण्यामुळे तेथे स्नान किंवा पूजापाठ करता येणार नाही. तरी आपण कोपरगाव येथील गोदावरी नदीला कुंभमेळा २०२७ यामध्ये समाविष्ट करून अविरत निर्मल वाहण्यासाठी मदत करावी अशी मागणी

कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक विभागीय उपआयुक्त राणी ताटे मॅडम यांना गुरुवार दि २८ ऑगस्ट रोजी एक निवेदन देण्यात आले आहे.यानिवेदन देते प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उपाध्यक्ष प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर, नाशिक येथील नमामी गोदाचे राजेश पंडित यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तसेच या निवेदनात कोपरगावच्या ऐतिहासिक बाबीचा उल्लेख करत कोपरगाव येथील गोदावरी नदी वरील लहान पुलाला जाळ्या बसविणे जेणेकरून लोक पुलावरुन खाली नदीपात्रात कचरा टाकणार नाही तर कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड, रक्षा टाकण्यासाठी रक्षा कुंड व देव देवतांचे फोटो व मुर्ती टाकणेकरीता कुंड मिळावा अशी मागणी देखील या निवेदनाव्दारे केली आहे.