Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

गुणवत्ता टिकवायची असेल तर शिस्त ही सवय झाली पाहिजे – आ.आशुतोष काळे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

गुणवत्ता टिकविण्यासाठी शिस्त ही सवय बनवणे गरजेचे आहे. क्षेत्र कोणतेही असो, शिस्तीच्या आधारावर केलेले कार्य हीच खरी गुणवत्ता असून, स्वयंशिस्तीच्या मार्गावरूनच गुणवत्तेच्या शिखराकडे जाणे शक्य आहे. आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने जाण्याचा मार्ग कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला पुढे जायचे असून गुणवत्ता टिकवायची असेल तर शिस्त हि सवय झाली पाहिजे असा महत्वपूर्ण सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिला.रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील शाखाप्रमुख सहविचार व गुणवत्ता सुधार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शिस्त ही गुणवत्तेची खरी ओळख गुणवत्ता सुधारण्यासाठी शिस्त फारच महत्त्वाची असते. यश हे गुणवत्तेच्या जोरावर मिळते, पण हे यश टिकवायचे असल्यास स्वयंशिस्त अत्यावश्यक असते. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न, पालक संवाद, आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. घटती विद्यार्थी संख्या हे मोठे आवाहन आहे जर विद्यार्थी टिकले, तर संस्था टिकेल आणि ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. यावर एकच उपाय म्हणजे गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.शैक्षणिक शिस्तीसाठी प्रसंगी काही वेळा वाईटपणा घ्यावा लागतो, शाखाप्रमुखांनी त्या भूमिकेसाठी सदैव तयार राहिले पाहिजे

जाहिरात

असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून केली. त्यानंतर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विभागातील शैक्षणिक, भौतिक व मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली. शालेय स्वच्छता, स्पर्धा परीक्षा, प्रवेश,शिक्षकांची रिक्त पदे,शाखा अडचणी, भौतिक सुविधा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड व ए आय संदर्भात प्रत्येक बाबीची माहिती दिली.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या कल्पनेतून व चेअरमन यांच्या कुशल प्रशासनातून नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान अध्यापनात वापरले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय. आधारित इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड यंत्रणेचा प्रभावी उपयोग, प्रशिक्षण आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गुणवत्ता सुधार कार्यक्रम विद्यार्थी प्रगती, शिकविण्याच्या पद्धती, शिक्षकांचे प्रशिक्षण, निकाल यामध्ये सुधारणा करण्याचे उपाय संस्थेने राबवले जात आहेत.विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी शाखांसमोर अनंत अडचणी आहेत.शाळांमधील अडचणींची नोंद, उपाययोजना व मागण्या विभागीय पातळीवर केल्या जात असल्याचे सांगितले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सौ.मीनाताई जगधने, राहुल जगताप, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, कार्यालयीन प्रमुख राजनंदन पांडुळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाखाप्रमुख उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »