जगाच्या पाठीवर चमकणारे तारे घडविण्यांचे काम संजीवनीने केले – सौ.स्नेहलता कोल्हे.
तालुक्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ज्ञान हा प्रत्येकाचा दागिना आहे, दहावी-बारावी शिक्षण घेवुन अभियांत्रिकी तांत्रिक शिक्षणातुन जगाच्या पाठीवर चमकणारे तारे घडविण्यांचे काम माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतुन केले असे प्रतिपादन माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केले.संजीवनी उद्योग समुह व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने तालुक्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. याप्रसंगी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेबरोबरच सरस्वती पुजन करण्यांत आले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन तीस वर्षापासुन हा उपक्रम सुरू असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी यावेळी सांगितले.संजीवनी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकुर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असुन स्टार्टअप इंडियासह देश विदेशातील औद्योगिकीकरणांला कोणत्या पध्दतीचे अभ्यासक्रम हवे आहेत त्याचा पाया संजीवनी विद्यापीठात घातला जात आहे. मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यांचे शिक्षण येथे दिले जाते. दहावी बारावी नंतर काय याबाबत उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि ज्ञान शिकविले जाते.प्रारंभी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमितदादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक करतांना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुला मुलींना के. जी. पासुन पी. जी पर्यंत तसेच पी.एच. डी चे दर्जेदार शिक्षण मिळावे हे स्वप्न माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी पाहिले आणि त्याच्या परिपुर्तीसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी काळाच्या वेगाने पावले टाकत अचूकपणाने यातील संधी शोधल्या, जागतिक स्तरावरील नासा, इस्रो, टाटा, जीओ रिलायन्स यासह देश विदेशातील महत्वाच्या पदावर संजीवनीचा विद्यार्थी काम करतो आहे याचा आम्हास अभिमान आहे.

विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच गुणात्मक शिक्षणाला प्राधान्य द्यावे.माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पालकांनी कष्ट घेवुन आपल्या पाल्यांना शिकविले. दहावी बारावीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे.उच्च शिक्षण घेतांना मुला-मुलींनी योग्य अभ्यासकम व शिक्षणसंस्था निवडुन वाटचाल करावी. आयुष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला तडजोड करावीच लागते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खेड्यापाड्यातील ग्रामिण भागातुन मातीशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतींने संजीवनीचे वैभव उभे केले आहे. सुज्ञ आणि तज्ञ पिढी येथे घडली जात आहे. भविष्य आणि आयुष्याला दिशा देण्यांचे काम संजीवनी अखंडपणे करत आहे. संकटाचा कितीही मोठा ढिगारा आला तरी त्यावर उभं राहुन शेवटपर्यंत आत्मविश्वास सोडु नका, विद्यार्थ्यांनी शिक्षणांतुन आपले आई वडील गुरूजन आणि तालुक्याचे नांव मोठे करावे.याप्रसंगी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डॉ. एम . व्ही. नागरहल्ली , के.बी.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए . आर . मिरीकर, डॉ. समाधान दहिकर आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.