ए आय तंत्रज्ञानाच्या सहायांने उस उत्पादन खर्चात तीस टक्के बचत- बिपीनदादा कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील उस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी ४० वर्षापुर्वी शाश्वत उपक्रम राबविले, आज नव्या तंत्रज्ञानाची क्रांती येत आहे, ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस उत्पादन खर्चात ३० टक्के बचत होवुन उत्पादन सव्वा ते दीडपट वाढते तेंव्हा शेतक-यांनी यात मोठया संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.कोल्हे कारखाना गेल्या चार हंगामापासुन उस लागवड, तोडणी कार्यक्रम थेट उपग्रहाच्या मदतीने देशात सर्वप्रथम राबवीत असल्याचेही ते म्हणांले.बारामती कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विद्या विभाग मॅप माय क्रॉप चे संचालक डॉ भुषण गोसावी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने सोमवारी कारखाना कार्यस्थळावर ए आय तंत्रज्ञान (कृत्रीम बुध्दीमत्ता) व उस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यांत आली होती त्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. कार्यकारी संचालक सुहास यादव प्रास्तविक करतांना म्हणाले की, शेतक-यांचे प्रति एकरी उस उत्पादन वाढावे म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे कारखान्याच्या उस व शेतकी विभागाच्यावतीने थेट शेतक-यांच्या बांधावर धडक कृती कार्यकम राबवत आहे, शास्त्रोक्त पध्दतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमांतुन कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे याबाबत जाणिवपुर्वक मार्गदर्शन देत आहेत. ए आय तंत्रज्ञानाच्या (कृत्रीम बुध्दीमत्ता) सहायांने शेतक-यांचे प्रति एकरी उस उत्पादन वाढविण्यांबाबत सातत्यांने कार्यशाळा, मेळावे घेवुन त्याबाबतचे ज्ञान दिले जात आहे.कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थित शेतक-यांचे स्वागत केले.डॉ.भुषण गोसावी याबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहायांने बारामती कृषी प्रतिष्ठानने कृषक् अॅप विकसीत केले असुन त्याबाबत गेल्या चार वर्षापासुन ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट कंपनी संशोधन करत असुन त्यातुन वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत व त्याचा प्रत्यक्ष वापर उस शेतीत सुरू केला. शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढुन खर्चात मोठया प्रमाणांत बचत झाली आहे. पीकउत्पादन वाढीसाठी पाणी, खत, मशागत, आरोग्य व्यवस्थापन, पीकावरील कीड-रोग, माती पाणी पृथ्यकरण, जमिनीतील ओलावा, अत्याधुनिक ड्रोनच्या सहायांने निरीक्षण माहिती संकलन, उस जात, जैविक खते, ठिबक सिंचन, हवामान विषयक सल्ला इत्यादी छोटे मोठे शेती विषयक तपशिलाबाबतची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचवुन त्यांना शाश्वत पीक उत्पादन मिळवुन देत आहे.

तेंव्हा प्रत्येक शेतक-यांनी ए आय तंत्रज्ञान वापरासाठी पुढाकार घेवुन घेवुन जास्तीत जास्त नोंदणी करावी. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची स्थापना करून त्या माध्यमांतुन उस उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेत सर्वप्रथम १९८४ मध्ये संजीवनीच्या कार्यक्षेत्रात ठिबक सिंचनाविषयी प्रभावी जनजागृती करून त्याचा प्रत्यक्ष वापर शेतीत केला होता. उस तज्ञ स्व. डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांच्या मार्गदर्शनांखाली कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक-यांसाठी मार्गदर्शन मेळावे घेवुन अत्याधुनिक तंत्रज्ञान सभासद शेतक-यांच्या दारात पोहोचविले आहे. पोहेगांवचे स्व. शामराव औताडे यांनी एकरी १०० मे. टनाच्या पुढे उसाचे उत्पादन घेवुन विक्रम केला होता. संजीवनीच्या कृषी संशोधन केंद्रात ६ हजाराच्या पुढे उस जाती विकसीत करून त्या देशभर पोहोचविल्या आहेत. देशपातळीवर शेतक-यांचे पीक उत्पादन वाढीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम एस स्वामीनाथन, डॉ कस्तुरीरंगन यांच्याबरोबरही आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. इफको कृभको मार्फतही निमकोटेड युरिया, लिक्वीड खत उत्पादनांवर भर दिला., शेतकरी सुखी तर जग सुखी हा प्रयत्न आपण सातत्यांने केला व आजही त्यावर काम सुरूच आहे. ए आय तंत्रज्ञानाच्या वापरातुन सध्या उस उत्पादनवाढीसाठी धामोरी कार्यक्षेत्रात स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या अनुभवांचे कथन माजी उपाध्यक्ष कैलासराव माळी यांनी यावेळी केले. शेवटी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री त्रंबकराव सरोदे, विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर होन, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, बापु बारहाते, विलासराव माळी, डॉ गुलाबराव वरकड, अंबादास देवकर, नवनाथ आगवण, साहेबराव रोहोम, भिमराव भुसे, विजय रोहोम यांच्यासह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, उस उत्पादक सभासद शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.