कोपरगांव व तिळवणी बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर शेतक-यांना मिळते रोख पेमेंट -सभापती साहेबराव पा.रोहोम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांना रोख पेमेंट करण्यात येत आहे.यामुळे धनादेश वटनावळ व बँकांच्या शुक्ल़काष्टातुन शेतक-यांची सुटका झालेली आहे. शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांच्या हातात रोख पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट धनादेशाने अदा करण्यात येत होते. शेतमालाचा मोबदला धनादेशाने मिळाल्याने एक तर बँकांच्या अडचणी आणि त्यात धनादेश वटण्यास लागणारा १५ दिवस ते महिन्याचा कालावधी यामुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत अनेक शेतक-यांनी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तक्रारी केल्या होत्या.यामुळे बाजार समिती संचालक मंडळाचे घेतलेल्या निर्णयामुळे मुख्य़ मार्केट यार्ड कोपरगांव व उपबाजार आवार तिळवणी या दोन्ही ठिकाणी शेतमाल विक्री नंतर शेतक-यांना शेतमाल विक्रीचे दिवशीच रोख पेमेंट देण्यात येत आहे. अशी माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव पा.रोहोम व उपसभापती गोवर्धन पा.परजणे यांनी दिली आहे.शेतकरी बांधवांना आपला शेतमाल विक्रीच्या दिवशीच संबंधित व्यापा-यांकडून पेमेंट रोख स्वरूपात घेवुन जावे. धनादेश अथवा आर टि जी.एस ने पेमेंट स्विकारू नये. पेमेंटबाबत काही तक्रार असल्यास त्वरित कोपरगाव बाजार समिती कार्यालयास संपर्क साधवा तसेच शेतक-यांनी जर पेमेंट बाकी ठेवल्यास सदरचे पेमेंट व्यक्तीगत संबंधातुन ठेवले आहे.असे गृहीत धरण्यात येईल. त्याची जबाबदारी बाजार समितीवर राहाणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमाल विक्रीच्या दिवशीच संबंधित व्यापा-याकडून रोख पेमेंट घ्यावे.असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.